शंभूराजे जन्मोत्सव

शंभूराजे जन्मोत्सव



1657 सालातील 14 मे चा दिवस उजाडला होता... स्वराज्यातील सुवर्णदिवसातील आणखी एका दिवसाचा सूर्योदय झाला आणि किल्ले पुरंदरचा आसमंत शंभूबाळांच्या रडण्याने दणाणला... स्वराज्यात सर्वत्र वातावरण अगदी उल्हासित झाले सणाचेच स्वरूप आले होते स्वराज्यातील प्रत्येक घराला... जिजाऊंना पण खुपच आनंद झाला थोरल्या आऊसाहेब झाल्याचा आनंद होता तो... आणि ही शुभवार्ता शिवरायांना लवकर कळावी म्हणून त्यांनी लगेच सांगावा धाडला विश्वास नावाच्या हेरासोबत.... त्यावेळी शिवाजीराजे मोहिमेवर होते..आणि शिवरायांना आपल्या धन्याला ही वार्ता लवकर कळावी म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट वेगाने विश्वास घोड्यावरून दौडत होता... त्याची गाठ रस्त्यात बहिर्जींसोबत पडली.. बहिर्जी म्हणाले काय रं इस्वास काय निरोप आणलास एवढ्या लगबगीने... विश्वासने बहिर्जींना मुजरा केला आणि म्हणाला नाईक बाळकृष्ण जन्मास आले.... आनंदाची वार्ता आहे.... स्वराज्याचे धाकले धनी आले म्हणून थोरल्या आऊसाहेबांनी राज्यास्नी सांगावा धाडला... लय बेस खबर दिली गड्या चल राजास्नी तातडीने खबर देऊ... आणि पुढील रस्ता निर्धोक आहे की नाही म्हणून बघायला आलेले बहिर्जी विश्वाससह तातडीने माघारी फिरले... काही अंतर घोडदौड केल्यावर राज्यांची भेट घडून आली... राजे म्हणाले काय बहिर्जी रस्ता निर्धोक आहे ना ! आणि निर्धोक असेल तर का फिरलात तुम्ही माघारी? 
     बहिर्जी म्हणाले राज रस्ता निर्धोक आहेच पर खबर लय बेस हाय राज.. स्वराज्याचे धाकले धनी आलेत......किल्ले पुरंदरी बाळकृष्णाचा जन्म झाला... राजे म्हणाले व्वा खुप आनंदाची खबर दिलीत आणि राज्यांनी आनंदाने आपल्या हातातील कडे विश्वासच्या हातात ठेवले...लागोलाग राजे तातडीने गडावर पोहचले आणि गडावर आल्यावर  प्रजेला साखर वाटप झाला...स्वराज्यात सर्वत्र आनंद ओसंडून वाहत होता आणि का नाही वाहणार? कारणही तसेच होते..छत्रपतीपुत्र जन्मास आले म्हणजे किती मोठा हर्ष... !
      सर्वत्र आनंद होता मात्र एक दुःखाची वार्ता पण होतीच राणीसाहेब सईबाई यांनी कायमचे अंथरून धरले होते.. चार पावले चालने सुद्धा त्रासाचे ठरत होते त्यांना... लगेच पायाला गोळे येत होते, अंथरुणावरून उठणे सुद्धा अवघड जाऊ लागले.. चार घास पोटात जात नव्हते शरीराला नुसती मरगळ आल्यागत झाले होते... आणि परिणामी शंभूबाळ आईच्या दुधाला पोरकं झालं होतं. सईबाई शंभूबाळाला उचलून जवळ सुद्धा घेऊ शकत नव्हत्या. त्यांचं अंतःकरण खुप जळत होत कारण शंभूबाळाला आईच प्रेम, वात्सल्य मिळत नव्हतं... शंभूबाळ भुकेने व्याकुळ होत होते.. त्याच आणखी जास्तच दुःख सईबाईंना होतं आणि हे जिजाऊंना बघवत नव्हतं म्हणून त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडच्या कुणबिणीचा शोध घेतला.. तीच नाव होतं धाराऊ. 
      धाराऊच बाळ जन्मताच मृत झालं होतं तेव्हा जिजाऊंनी धाराउला शिवपुत्रास दूध पाजण्यास विचारले आणि त्या माउलीने ही ईश्वरी सेवा म्हणून लागलीच होकार दिला धाराऊ म्हणाल्या आम्हाला देवाच्या लेकरास दूध पाजायची नामी संधी चालून आलिया हे तर माझे पूर्वजन्मीची पुण्याईच...                  शंभूबाळ धाराऊंच्या दुधावर आणि जिजाऊंच्या तालमीत वाढू लागलं... शंभूबाळ गडावर सर्वत्र दुडूदुडू धावायला लागलं.. ते कौतुक बघायला सईबाई अंथरुणातून उठू पण शकत नव्हत्या आणि अंथरुणात पडून रडण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हत्या त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच होता त्यात कोणतीही सुधारणा होतं नव्हती सगळे चिंतेत होते आणि शिवपुत्र शंभूबाळ अवघ्या सव्वादोन वर्षाचे असताना सईबाईंनी या जगाचा निरोप घेतला... शंभूबाळ आईच्या प्रेमाला पोरक झालं ते कायमचच... 
  जन्मापासून शंभूराजे जणू संकटे घेऊनच जन्माला आले होते... पुढे वयाच्या नवव्या वर्षी प्रत्यक्ष दैत्य असलेल्या औरंग्याच्या मगरमिठीत शिवरायांसह अडकले मात्र त्यातून सुखरूप सुटका, ओलीस म्हणून दिलेरखान व मिर्झाराजे यांचे छावणीत वास.. महाराजांच्या सततच्या मोहिमांमुळे वडिलांच्या प्रेमास वंचित... महाराजांचे अकाली निधन, मंत्र्यांचे कुटील कारस्थाने, शंभुराजेंना डावलून दहा वर्ष्याच्या राजारामांचा राज्याभिषेक, शंभूराजेंच्या अटकेचा डाव,तीन वेळा विषप्रयोग, पाच पाच बलाढ्य शक्तींशी एकाचवेळी यशस्वी लढा, सतत लढ़ाया आणि मोहिमा,एकशे वीस पेक्षा जास्त लढ़ाया लढून सुद्धा आयुष्यात एकही लढाई न हरलेला जगातील एकमेव राजा.. आणि शेवटी दगाफटक्याने पकडले जाऊन चाळीस दिवस अत्यंत हाल करून औरंग्याकडून हत्या..... 
    एकंदरीत शंभूराज्यांचे आयुष्य केवळ संकटांनी वेढले गेले होते हे आपल्या लक्षात येते.. मात्र संकटे एखाद्या व्यक्तीचा पाठपुरावा त्याच्या मरणापर्यंत करत असते परंतु शंभूराजांचा पाठपुरावा अजूनही चालूच आहे.. अजूनही लोक त्यांच्या  चारित्र्याच्या ठिकर्या उडवण्यात धन्यता मानतात.. त्यांना दारुड्या, रंडीबाज म्हणून त्यांची समाजात बदनामी करण्यात आली. मात्र सत्य ते सत्य असत... आणि जगाला खरे शंभूराजे काही जिज्ञासू इतिहासकारांमुळे समजायला लागले... मात्र जगाला खरे शंभूराजे कळायला चारशे पेक्षा जास्त वर्ष लागतात ही एक शोकांतिका म्हणावी की षडयंत्र हा एक प्रश्नच...असो....... 
      मात्र एवढं सगळं वाट्याला येऊन सुद्धा शंभूराजे खचले मुळीच नाही.. उलट त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी सप्तहजारी मनसबदारी मिळवली, वयाच्या चवदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला, सतरा भाषा आत्मसात केल्या, जातीधर्म भेद नाकारला, चार ग्रंथांचे लेखन केले, उत्कृष्ट राजकुमार राजाच नव्हे तर उत्कृष्ट कवि म्हणून पण नावलौकिक मिळवले. आयुष्यात एकशे वीस लढ़ाया जिंकून एकही लढाई न हरणारे राजे ठरले आणि त्याची दखल ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली.
   अशा राजांचा इतिहास नक्कीच प्रेरणादायी ठरतो. शंभूराज्यांचे चरित्र हेच शिकवते की संकटे राजपुत्राला,राजाला सुद्धा असतात मात्र त्याला घाबरून,खचून न जाता त्यावर मात करता येते ते आपल्या प्रयत्नातून आणि इतिहासात आपले नाव आपल्या कर्तबगारीने सुवर्ण अक्षरात लिहिता येते ते केवळ आपल्या कर्तबगारीतुन... 
   मात्र महाराष्ट्राची, देशाची शोकांतिका ही आहे की आम्हाला बाबर, खिलजी, अकबर, हुमाँयू,शाहजहाँ शिकवले जातात मात्र शिवरायांचा, शंभूराज्यांचा, इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळला जातो...
   आज आपण एक कार्य तर करूच शकतो की जरी पाठ्यपुस्तकातून शिवराय, शंभूराजे वगळले जात असतील पण आमच्या मनातून त्यांना वगळले जाणे शक्य नाही हे दाखवून देऊ शकतो.. आम्ही शिवराय, शंभूराजे आमच्या काळजात कोरून ठेवणे आवश्यक आहे  आणि त्यांचा इतिहास घरात आपल्या मुलांना सांगायचा आहे परिणामी मुलांना शिवराय आणि शंभूराज्यांच्या इतिहासात साक्षर करने आमचे प्रथम कर्तव्य समजून त्यांना खरे शिवराय,शंभूराजेंची ओळख करून देणे प्रथम कार्य समजावे.. आणि जर आपण हे करू शकलो तरच समजूया की आपण आजची शंभूराज्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करतोय... 


  जय शहाजी जय जिजाऊ !
जय शिवाजी जय संभाजी !!
हर हर महादेव 


    विनीत 
पुंडलिक लसनकुटे 
मु.वढवी ता.कारंजा जि. वाशिम 
7798636169


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मोजक्या  लोकांच्या उपस्थितित आदर्श विवाह संपन्न मंगरुळनाथ प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार }
Image
गरीबांना मदत करुन साजरी करा ' रमजान ईद '  टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख
Image
पंचशील स्कुलमधे संभाजी महाराज जयंती साजरी
Image
ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष  लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या  बोरगाव पांदनरस्ता  कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे
Image
*‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी* · सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु · सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ३१ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली असून या काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्रीच्या वेळा यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रात ही सूट लागू राहणार नाही. *जिल्ह्यात ह्या सेवा राहणार प्रतिबंधित :-* सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन अथवा दूरस्थ शिक्षणाकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे भरवित येणार नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई असेल. याशिवाय ६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. *जिल्ह्यात ह्या सेवा सुरु राहणार -* सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. एका व्यक्तीसह दुचाकी, चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली राहतील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळे १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहतील. या कार्यालयांची कामे नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे. *****
Image