ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष  लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या  बोरगाव पांदनरस्ता  कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे

ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष


 लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज
वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या
 बोरगाव पांदनरस्ता


 कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे दि. १७ मे
                     सध्या कोरोना  या महाभयंकर बिमारीचे सावट आणि नंतर मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना शेती रस्त्याचे सावट आता जून महिना लागत आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतीची तितकीच काळजी असते सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्याधुनिक यंत्रणेला सर्वाधिक पसंती शेतकऱ्याची असते सरर्वच कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने करावी लागत आहेत पूर्वीच्या काळामध्ये चाळीस फुटाच्या
                जवळपास रस्ते असायचे पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही कारण अक्ख शेत गेले तरी चालेल पण धुरा जाऊ द्यायचं नाही अशी वृत्ती अनेक शेतकरी वर्गामध्ये असल्यामुळे आहे ते रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात गेले आहे काही तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पांगरी नवघरे भागातील जसेकी बोरगाव पांदण रस्ता या रस्त्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाले आहे व या संबंधित  शेतकरी वर्गाने तक्रार दाखल केली आहे गावचे तलाठी मंडळाधिकारी पोलीस पाटील सरपंच यांनी पाहणी केली असून अहवाल  तहसील कार्यालयामध्ये  जमा केला आहे पण अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही अजून जे शेतातील पाण्याचा स्त्रोत आहे मुख्य द्वार बंद झाल्यामुळे त्यामधील शेताचे व गावानजीक घाणीचे पाणी एकत्र होत असल्यामुळे  असलेले पाणी हे गाव मध्ये शिरत आहे  सध्या काही दिवसांनी पावसाळ्याला सुरुवात होतं जर या पाण्याचा प्रवाह गावात शिरतच राहिला तर कुठल्याही बिमारी ला आमंत्रण देण्याला वेळ लागणार नाही 
               सर्वच पांदन रस्त्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यामुळे सर्व शेतीचे अवजारे घेऊन सर्व वाहने गावांमधून प्रवेश करत असतात अशातच लहान मुले रस्त्यावर खेळत असताना कुठलाही अनर्थ होऊ शकतो पण ह्या गोष्टी जबाबदार व्यक्तीचा लक्षात कधी येतील का प्रशासनाला कधी कळेल का पांगरी नवघरे शिवारामध्ये सर्व पांदण रस्ते व वहीवाटा अतिक्रमणाच्या विळख्यात असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पांगरी नवघरे 


परिसरामध्ये कोली प्रकल्प तूडूबभरला ही जाण्याची फार कठीण होत आहे ज्या वहिवाट आहेत त्या प्रशासनाच्या निद्र अवस्थेमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत आज घडीला कोरोणासारख्या महाभयंकर बिमारी ने सर्वत्र हाहाकार माजविला आहे सर्व कामे ठप्प झाली आहे आणि अशातच शेवटी सर्वच गोष्टी शेतीवर अवलंबून आले आहेत
               भारत हा कृषिप्रधान देश आहे भारताचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९०५ या कायद्याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला आपल्या शेतापर्यंत जाण्याचा अधिकार आहे त्याला रस्त्या हा असतोच जर अशा रस्त्यावर  अतिक्रमण केले असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार समोर तक्रार दाखल करून आठदिवसाच्या आतहा रस्ता मोकळा करूशकतो त्यामध्ये न्याय मिळण्याची मामलेदार कोर्ट पाच कलम अर्ज नमूद केला आहे


 अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पत्त्यासह लिहून त्यामध्ये मजकूर होणारे घटकांसह शेती रस्त्याचे अतिक्रमण हे जमीन बिन शेती असल्यास जमिनित पर्यंतचा रस्ता नकाशा मध्ये दर्शविला असतो परंतु आज घडीला तसे काहीच राहिले नाही कारण कायदा-सुव्यवस्थेचा कुणाला भेवच राहिले नाही पूर्विच्या प्रशासनात कामकाजात आणि आत्ताच्या कामकाजात जमीन-अस्मानचा फरक आहे शेतकऱ्यांना खूप कुठल्या अधिकार्‍यावर विश्वास नाही नेमका गोष्टीचा न्यायनिवाडा होईल का नाही मोठ्या शरमेची बाब आहे आपल्यापेक्षा इंग्रज बरे होते त्यांच्या काळामध्ये सर्व जमिनीचे मोजमाप झाले होते सर्व नकाशे तयार झाले होते परत शेतकर्‍यांच्या वतीने सरकारला अशी विनंती करतआहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विधिमंडळामध्ये आज रोजी ९० टक्के आमदार खासदार अनेक स्तरातले लोकप्रतिनिधी शेती शेतकरी वर्गातून आहेत त्यांना कसे कळत नाही सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व एकत्र येतात पण मायबाप कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी का नाही अनेक शेतकरी संघटना आहेत आपण पाहतो सर्वाधिक तक्रारी फौजदारी गुन्हे हे शेतीवर अवलंबून आहेत कोणाच्या शेतात रस्ता नाही कुणाचा माल आहे तो आणायचा आहे त्याला अडचण अनेक पण त्याचे रूपांतर हाणामारी होऊन अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले ह्या गोष्टी कधीच शासनाच्या लक्षात येतील का पूर्ण जमिनीचे पूर्ण मोजमाप करून पूर्ण डिजिटल डिजिटलायझेशन नकाशे तयार करून ज्या शेतीच्या वहिवाट आहेत पांदण रस्ते आहेत हे कधी मोकळा श्‍वास घेतील का असाही प्रश्न निर्माण होतो आपल्या प्रशासनाला कधी लक्षात येईल का सर्व 
            केंद्रीय राज्यस्तरीय यांना लक्ष देण्याची फार गरज आहे शेतीचा वाद भाऊ भावाला ओळखत नाही शासनाच्या जमीन प्रमाणामध्ये आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे शासनाला सुद्धा ठाऊक नाही तरी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने प्रशासनांना एकदा ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची फार गरज आहे


Popular posts
कारंजा हुंकार
Image
पिपंळगांव येथील सरपंचाचा उपक्रम
Image
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मोजक्या  लोकांच्या उपस्थितित आदर्श विवाह संपन्न मंगरुळनाथ प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार }
Image
नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी एकत्र येण्यास मनाई
Image
*‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी* · सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु · सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ३१ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली असून या काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्रीच्या वेळा यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रात ही सूट लागू राहणार नाही. *जिल्ह्यात ह्या सेवा राहणार प्रतिबंधित :-* सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन अथवा दूरस्थ शिक्षणाकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे भरवित येणार नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई असेल. याशिवाय ६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. *जिल्ह्यात ह्या सेवा सुरु राहणार -* सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. एका व्यक्तीसह दुचाकी, चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली राहतील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळे १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहतील. या कार्यालयांची कामे नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे. *****
Image