गर्दी टाळण्यासाठी चक्रानुक्रमे उघडावीत प्रकारनिहाय दुकाने  ग्रीन झोनमधील सुखद शिथिलतेत मौज करणाऱ्यांना चाप लावणे आवश्यक सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी.

गर्दी टाळण्यासाठी चक्रानुक्रमे उघडावीत प्रकारनिहाय दुकाने 


ग्रीन झोनमधील सुखद शिथिलतेत मौज करणाऱ्यांना चाप लावणे आवश्यक


सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी.


मंगरुळपीर प्रतिनीधी — अशोक राऊत  { कारंजा हुंकार } 


 अढळत असलेले रुग्ण व संशयित पाहता ग्रीन झोनमधील होत असलेली बेसुमार गर्दी टाळायची असल्यास ठराविक प्रकारच्या दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्याची परवानगी दिल्यास गर्दीस आळा घातला जाईल त्यामुळे प्रशासनाने तसे नियोजन करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी एका प्रसिध्दीपञकाव्दारे प्रशासनाकडे केली आहे.
            मंगरूळपीर तालुक्यातील रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
त्यातच गेले कित्येक दिवसांपासून लॉक डाऊनचा सामना करीत असलेली जनता ग्रीनझोनच्या सुखद शिथिलतेचा मनसोक्त लाभ घेत आहे.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी येत आहेत यातील सर्वच लोकांना अत्यावश्यक कामे नसून काहीजण ज्यांना काम आहे त्या लोकांसोबत सोबत सोबती म्हणून फिरायच्या निमित्ताने बाहेर पडताहेत. मोटर सायकलवर केवळ एक व्यक्ती अपेक्षित असतांना सर्रास दोन व्यक्ती व ट्रिपलसिटही प्रवास करीत आहेत.  भाजीपाल्याच्या दुकानांवर गर्दी असून एरव्ही दोन-तीन दिवसांचा भाजीपाला नेणारे नागरिक आता दररोजच भाजीपाला खरेदी करू लागले आहेत. आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन नागरिक तहसील कार्यालयावर गर्दी करू लागले असून यातील अनेक कामे ही अत्यावश्यक नसणारी आहेत व ती लॉक डाऊन संपल्यानंतरही केली जाऊ शकतात अश्या प्रकारची असल्याचे दिसून येते. काही जण तर घराबाहेर पडण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी केवळ निमित्तच शोधत असल्याची  चर्चा होतांना दिसते. अशी मंडळी कोरोना विषाणूच्या प्रकोपापासून गंभीर नसल्याचे दिसते.
         ग्रीन झोनमध्ये समावेश झाल्याने ४ मे पासून वाशिम जिल्हाधिकारी यांनी लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. इतके दिवस घरात दडून बसावे लागल्याने आधीच सैरभैर झालेल्या काही लोकांना कधी एकदाचा घराबाहेर पडतो याची वाट शिथिलतेने मोकळी करून दिली आहे लोक लॉक डाऊन मध्ये शिथिलता मिळाली असली तरीही कोरोना विषाणूने देशाचा पिच्छा सोडलेला नाही एवढेच नाही तर लगतच्या अकोला अमरावती व यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रीन झोन मध्ये असल्याचा अविर्भाव आणून जाणे योग्य नाही मात्र मंगरूळपीर येथील बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता लोकांकडून सोशल डिस्टन्स पाळल्या जात नसल्याचे व एकाच वेळी सगळ्या प्रकारची दुकाने उघडी असल्यामुळे लोकांचीही गर्दी होत आहे. त्यातल्या त्यात दारूची दुकाने उघडल्याने तळीरामांना मोकळे रान मिळाले आहे. लोकांची गर्दी वाढतच चालल्याने लॉक डाऊन चे तीन-तेरा वाजत आहेत यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहता अशा प्रकारची दुकाने विशिष्ट प्रकारची दुकाने दुकाने ठराविक दिवशीच उघडल्या जावी जेणेकरून लोकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल व पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर तणाव वाढणार नाही तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन करता येणे व करून घेणे शक्य होईल .नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचा करण्यासोबतच आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी स्वतः काळजी घेणे अपेक्षित आहे अन्यथा ग्रीनझोन मधून किंवा ऑरेंज किंवा मध्ये जाण्यास वेळ लागणार नाही तसे झाल्यास पुन्हा घरात बसण्याची वेळ येऊ शकते याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असेही मतही फुलचंद भगत यांनी मांडले आहे. काही नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नुसार प्रशासनाने एकाच दिवशी सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्याऐवजी विशिष्ट प्रकारची दुकाने ठराविक दिवशी उघडण्याचे नियोजन केल्यास या चक्रानुक्रमामुळे गर्दी कमी होण्यास मदत होऊन फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते तसेच त्यामुळे प्रशासनावरील ताणही हलका होऊ शकतो.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या स्तरावर नियोजन करुन तसे आदेश पारीत करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मोजक्या  लोकांच्या उपस्थितित आदर्श विवाह संपन्न मंगरुळनाथ प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार }
Image
गरीबांना मदत करुन साजरी करा ' रमजान ईद '  टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख
Image
पंचशील स्कुलमधे संभाजी महाराज जयंती साजरी
Image
ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष  लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या  बोरगाव पांदनरस्ता  कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे
Image
*‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी* · सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु · सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ३१ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली असून या काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्रीच्या वेळा यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रात ही सूट लागू राहणार नाही. *जिल्ह्यात ह्या सेवा राहणार प्रतिबंधित :-* सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन अथवा दूरस्थ शिक्षणाकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे भरवित येणार नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई असेल. याशिवाय ६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. *जिल्ह्यात ह्या सेवा सुरु राहणार -* सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. एका व्यक्तीसह दुचाकी, चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली राहतील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळे १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहतील. या कार्यालयांची कामे नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे. *****
Image