उन्हामुळे वन्य प्राण्यांच्याही जीवाची होत आहे लाही लाही उन्हाच्या झळा वाढल्या, पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती वन्यप्रान्यांसाठी कृञीम पाणवठे तयार करन्याची गरज

उन्हामुळे वन्य प्राण्यांच्याही जीवाची होत आहे लाही लाही


उन्हाच्या झळा वाढल्या, पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती


वन्यप्रान्यांसाठी कृञीम पाणवठे तयार करन्याची गरज


मंगरुळपीर— अशोक राऊत { कारंजा हुंकार }


-सध्या मे महिना अक्षरशः आग ओकत असुन ऊन्हाची तिव्रताही वाढली आहे अशातच वन्यप्राण्यांच्या जीवाची लाहीलाही होत असुन ते पाण्यासाठी भटकंती करत आहेत त्यामुळे त्यांचेकरीता कृञीम पानवठे निर्माण करन्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
              खळखळणारे नदीनाले... पाण्याने तुडुंब भरलेले डोह... झुळझुळ वाहणारे नद्यांचे प्रवाह... किलबिल करणारे पक्षी... कोकिळेचे मंजुळ गाणे... मोरांची म्यॉंव म्यॉंव... वृक्षवल्लींमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार...असे दृष्य आज रानावनात पाहायला मिळत नाही. कारण, निसर्गातील 'जीवन' म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा 'पाणी' नावाचा घटक आटल्याने जंगलात पाण्यासाठी जणूकाही 'लॉकडाऊन' सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे. पाण्यासाठी वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच करीत आहेत.चैत्र महिनाही संपला आहे. वैशाखही लागला आहे. वैशाखापूर्वीच सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. निसर्गातील नदी, नाले, जलस्रोत आजच आटले आहेत. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे.धरण उशाला कोरड घशाला पडत आहे. देशभर संचारबंदी सुरू आहे. सर्व जग घरांत दडून बसले आहे. जंगलात मात्र कुठलेच 'लॉकडाऊन' नाही. तरीदेखील पाणवठ्याअभावी वन्यजीवांमध्ये 'लॉकडाऊन' सुरू असल्याचे चित्र आहे. पाणी मिळेल या आशेने वन्यप्राणी नागरी वस्त्यांच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यात कांही हिंस्र प्राण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष उद्‌भवू शकतो.हे वन्यप्राणी गावाकडे येऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवुन कृञीम पानवठेही तयार केलेत परंतु अजुनही प्रशासनाने लक्ष देवुन वन्यप्रान्यांसाठी पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे फुलचंद भगत यांनी सांगीतले.जंगलात पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या शासन कोरोनाची उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाणवठ्यांअभावी जंगलात 'लॉकडाऊन' झाले असल्याने तहानेने व्याकूळ वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. उन्हामुळे नदिनाल्यांसह जमिनीतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी व पक्षी शेतशिवाराकडे येत आहेत. शेतात असलेले रब्बी व उन्हाळी पिकेही संपुष्टात आले आहेत. प्राणी व पक्षी गावालगतच्या शेतवस्तीकडे पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्राण्यांची शिकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.वनविभागाने कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम पाळून योग्य ते नियोजन करून वन्यप्राण्यांकरीता पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत तसेच वन्यप्रेमींकडूनही होत आहे.मंगरुळपीर तालुक्याच्या चहूबाजूंच्या जंगलात हरिण, काळवीट,मोर,लांडोर,ससे,रानडुक्कर, माकड व इतर जंगली प्राणी आहेत. तर  जंगलातील क्षेञामध्ये काळवीट व हरणाचे कळपच्या कळप दृष्टीस पडतात. वनविभागाने या वन्यप्राण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. 


 
वनविभागाने त्वरित पाणवठे तयार करावेत 


दरवर्षी वनविभागाकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जंगलात वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जात नाहीत . यावर्षी कोरोनामुळे तर दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. तरी वनविभागाने त्वरित "ऍक्‍शन मोड'मध्ये येऊन कृत्रिम पाणवठे तयार करावेत. वन्यप्राण्यांसह पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्फे फुलचंद भगत यांचेसह परिसरातील वन्यजीव प्रेमीकडुन केली जात आहे.


Popular posts
ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष  लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या  बोरगाव पांदनरस्ता  कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे
Image
*‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी* · सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु · सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ३१ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली असून या काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्रीच्या वेळा यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रात ही सूट लागू राहणार नाही. *जिल्ह्यात ह्या सेवा राहणार प्रतिबंधित :-* सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन अथवा दूरस्थ शिक्षणाकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे भरवित येणार नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई असेल. याशिवाय ६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. *जिल्ह्यात ह्या सेवा सुरु राहणार -* सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. एका व्यक्तीसह दुचाकी, चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली राहतील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळे १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहतील. या कार्यालयांची कामे नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे. *****
Image
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मोजक्या  लोकांच्या उपस्थितित आदर्श विवाह संपन्न मंगरुळनाथ प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार }
Image
गरीबांना मदत करुन साजरी करा ' रमजान ईद '  टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख
Image