सध्या ग्रामीण भागात होताय जिल्हा संचार बंदीचे उल्लंघन

सध्या ग्रामीण भागात होताय जिल्हा संचार बंदीचे उल्लंघन


 



मालेगाव प्रतिनीधी — दत्तात्रय शिंदे: {कारंजा हुंकार }


आज रोजी आपण पाहता आपल्या आजूबाजूचे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत काही ऑरेंज झोनमध्ये आहे पण आपण मात्र ग्रीनझोन कडे वाटचाल करतोय आपले प्रशासनही तितकेच सतर्क आहेत पोलीस प्रशासनाचा तहसील प्रशासन जिल्हा प्रशासन सर्वच बाबतीत एक्टिवआहेत 
            आज यांच्यामुळेच आपण ग्रीन झोन मध्ये आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल तर प्रशासनाच्या वतीने आणखी तडक उपायोजना करणे बंधनकारक आहे कारण आपण पाहत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत  प्रत्येक गावांमध्ये कोणता ना कोणता पांदनरस्ता असतो असे पांदन रस्ते गावापासून सुरुवात होऊन जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत समाप्त होतात अनेक गावांना या पांदन रस्त्यावर द्वारे जोडले जातात शिवाय अनेक ग्रामपंचायतींमध्ये सध्या ग्रामसुरक्षा दल सुद्धा स्थापन नसल्यामुळे हे रस्ते जिल्ह्यासाठी धोकादायक होऊ शकतात
           याची खबर घेणे तितकेच गरजेचे आहे आपला जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासनाच्यावतीने सर्व हव्यात्या उपायोजना दिवस-रात्र चालू आहेत पण सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या अनेक मजूर वर्ग बाहेर फसलेले आहेत व ते या ना त्या मार्गाने गावांमध्ये प्रवेश करत आहे कोणी आपल्या शेतात तर कोणी आपल्या घरांमध्ये वास्तव्यास असून ह्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोरणा-या महाभयंकर बिमारी ला हलक्याच घेत आहे पण आज एका व्यक्तीमुळे जिल्हा लाल धोका होने ही
      काहीनव्यानेगोष्ट नाही अशा सीमा लगत रस्त्यांना जर चापबसवायचा असेल तर आपल्यालाही काही गोष्टी हिंगोली जिल्ह्यांमधून घ्यावे लागतील जसे की या चोर रस्त्याचा सर्रास वापर हे टुविलर वाले करत आहेत अशा।      परिस्थितीमध्ये यावर उपाययोजना म्हणून सर्व पेट्रोल पंप धारकांना सूचना द्याव्या कि या विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पेट्रोलचा पुरवठा बंद करावा तसेच ग्रामीण भागामध्ये सर्रास सध्या पेट्रोलची विक्री होत असते प्रत्येक दुकानांमध्ये पाच लिटर दहा लिटर पेट्रोल सहज उपलब्ध होऊ शकते अशा लोकांना व सर्व नागरिकांना ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवा व काही रुग्णांना आपल्या जिल्हा अंतर्गत एक लिटर पेट्रोल पुरेसे  हो ऊशकते तसेच डिझेलचे सुद्धा सर्व पेट्रोल पंप धारकांना नोटीस बजावून कोणत्याही व्यक्तीला एक लिटर च्यावर पेट्रोल देणे बंधन असायला हवे जर पेट्रोल डिझेल या गोष्टीवर नियंत्रण ठेवले तर पन्नास टक्के वाहतूक की आपोआप कमी होईल आणि याचा फायदा आपल्या व आपल्या जिल्ह्याला होऊ शकतो या गोष्टीवर नियंत्रण।              
     आणण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत तालुका पंचायत तसेच अनेक गावातील ग्रामस्थ व ग्राम सुरक्षा दलांना तशा सूचना द्याव्यात प्रत्येक गावच्या सरपंचांना कशात ताकीत द्या व्या ह्या
 सर्व गोष्टी जर पाळल्या गेल्या तर आपण सुरक्षित राहू शकतो घरीच रहा सुरक्षित रहा


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मोजक्या  लोकांच्या उपस्थितित आदर्श विवाह संपन्न मंगरुळनाथ प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार }
Image
गरीबांना मदत करुन साजरी करा ' रमजान ईद '  टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख
Image
पंचशील स्कुलमधे संभाजी महाराज जयंती साजरी
Image
ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष  लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या  बोरगाव पांदनरस्ता  कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे
Image
*‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी* · सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु · सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ३१ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली असून या काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्रीच्या वेळा यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रात ही सूट लागू राहणार नाही. *जिल्ह्यात ह्या सेवा राहणार प्रतिबंधित :-* सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन अथवा दूरस्थ शिक्षणाकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे भरवित येणार नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई असेल. याशिवाय ६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. *जिल्ह्यात ह्या सेवा सुरु राहणार -* सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. एका व्यक्तीसह दुचाकी, चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली राहतील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळे १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहतील. या कार्यालयांची कामे नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे. *****
Image