कारंजा हुंकार

 


          घरोघरी जाऊन त्या घरातील प्रत्येक सदस्यांची पूर्व कोरोना अथवा साधी मेडिकल चाचणी करण्याची मागनी —


कारंजा लाड — ( कारंजा हुंकार ) 


संपूर्ण देशात संसर्ग जन्य अश्या कोरोना चा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढत आहे .आपले राज्य ही त्यापासुन सुटले नाही . माननीय मुख्यमंत्री  उध्दव जी ठाकरे , आरोग्य मंत्री राजेश जी टोपे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड, ना. अशोकरावजी चव्हाण ह्यांनी योग्य वेळी योग्य नियोजन करून कठोर निर्णय घेतल्यामुळे मुंबई , पुणे ठाणे, औरंगाबाद , नागपूर , रायगड , सातारा आदी जिल्हे सोडले तर उर्वरित जिल्ह्यात कोरोना विषाणू चे संक्रमण रोखण्यात राज्य सरकार ला यश आले आहे . तर वाशिम जिल्ह्यात सुदैवाने आजपर्यंत तरी डाॅक्टर मंडळी , पोलीस प्रशासन , सफाई कामगार , जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक, तहसीलदार , मुख्याधिकारी , पटवारी , नगराध्यक्ष सारख्या अनेक कर्तृत्ववान अधिका-यांनी तसेच पत्रकार बांधव ह्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत योग्य नियोजन केल्यामुळे च कोरोना चा शिरकाव झाला नाही. भविष्यात ही वाशिम जिल्हा च नव्हे तर राज्यातील आॅरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्हयात कोरोना चा मोठ्या प्रमाणावर शिरकाव न होण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक घरोघरी जाऊन त्या घरातील प्रत्येक सदस्यांची पूर्व कोरोना अथवा साधी मेडिकल चाचणी करण्याचें आवाहन वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अॅड संदेश जैन जिंतुरकर व वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस अब्दुल राजिक ह्यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकार ला केली आहे. खा. राहुल जी गांधी यांनी ह्यापूर्वी च केंद्र सरकार ला ह्या बाबत सुचना केली आहे.
       त्यात ताप , खोकला , दमा , सर्दी पडसे व हातपाय दुखने इ. समावेश असावा . मुंबई , पुणे व इतर राज्यातुन तसेच विदेशातुन कोणी आले असेल तर त्यांची चौकशी करून माहिती घ्यावी असे आवाहन ही निवेदनाद्वारे केले आहे.
        हे फार आव्हानात्मक काम असुन ह्या साठी नोंदणीकृत एनजीओ ( NGO Ragister ) , व नगरसेवक ह्यांची मदत घेण्यात यावी . उदा. वाशिम जिल्हयाचा विचार केला तर हा उपक्रम राबविण्यासाठी
       जिल्हयात तीन नगर परिषदा आहेत त्या प्रत्येक नगर परिषद मधील प्रत्येक वार्ड मध्ये एक कर्मचारी व एक नगरसेवक असे दोन दोन व्यक्ती ची नियुक्त करुन प्रत्येक घरोघरी जावुन माहिती घेण्यात यावी
       तसेच ग्रामीण भागातही पंचायत समिती सदस्यांची नियुक्ती करून अश्याप्रकारची मोहीम राबवावी राज्यातील काही शहर व ग्रामीण भागात अश्या प्रकारची मोहीम आजही राबविण्यात येत आहे पण राज्य पातळीवर सरकारने ही मोहीम सक्तीची करुन राबविली तर त्यात आणखी पारदर्शकता येईल. आजच्या परिस्थिति कोणताही नागरिक कोरोना च्या भीतीने स्वतःहुन चाचणी करुन घेण्यास पुढे येत नाही आहे ह्याबाबत ची माहिती वृत्तपत्राव्दारे व न्युज चैनल च्या माध्यमातून संपूर्ण राज्यातुन समोर येत आहे.
       नगर परिषद मध्ये साधारणतः प्रत्येक वार्ड हा अंदाजे 1500 ते 2000 लोकसंख्येचा आहे .एवढ्या मोठ्या वाडॅ मध्ये दोन कर्मचारी अपुरे पडत असतील तर प्रत्येक 500 लोकसंख्ये मागे दोन कर्मचारी नियुक्त करण्यात यावे  अर्थात ह्या बाबतीत पोलीस प्रशासन , स्थानिक डाॅक्टर व पत्रकार ह्यांना विश्वासात घेऊन नियोजन करून चाचणी घेण्यात आली तर आॅरेंज व ग्रीन झोन मधील जिल्हयात कोरोना चा शिरकाव होणार नाही व भविष्यात होणारा मोठा धोका टाळता येईल .
     एनजीओ ह्यांची जोखीम जास्त असल्यामुळे शक्य असल्यास मानधन देण्याचा विचार व्हावा व सुरक्षिततेसाठी मास्क , सानिटायझर सारख्या वस्तू पुरविण्यात याव्यात तसेच कामात अडथळा निर्माण केल्यास अधवा काही दिरंगाई वा कसुर केल्यास कारवाई ची तरतूद करण्यात यावी त्याचप्रमाणे प्रत्येक सदस्यांच्या बोटावर चाचणी केल्या नंतर शाई लावण्यात यावी. असे आवाहन केले आहे.


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मोजक्या  लोकांच्या उपस्थितित आदर्श विवाह संपन्न मंगरुळनाथ प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार }
Image
गरीबांना मदत करुन साजरी करा ' रमजान ईद '  टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख
Image
पंचशील स्कुलमधे संभाजी महाराज जयंती साजरी
Image
ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष  लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या  बोरगाव पांदनरस्ता  कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे
Image
*‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी* · सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु · सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ३१ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली असून या काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्रीच्या वेळा यापूर्वीप्रमाणेच कायम राहतील. सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्रात ही सूट लागू राहणार नाही. *जिल्ह्यात ह्या सेवा राहणार प्रतिबंधित :-* सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहतील. कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन अथवा दूरस्थ शिक्षणाकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे भरवित येणार नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यावर बंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई असेल. याशिवाय ६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. *जिल्ह्यात ह्या सेवा सुरु राहणार -* सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही. एका व्यक्तीसह दुचाकी, चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने व्यायामासाठी व्यक्तींना खुली राहतील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळे १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहतील. या कार्यालयांची कामे नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे. *****
Image